खरं तर आपण जेव्हा अशा बिकट परिस्थितीतून जात असतो, तेव्हा फार तीव्रतेने निश्चय करत असतो
माझी आर्थिक परिस्थिती कितीतरी वाईट होती; पण मी मात्र शिक्षणाची वाट सोडायला तयार नव्हतो. मला शिक्षणाची वाट स्पष्टपणे दिसायला लागली, जेव्हा मी १९९९ मध्ये जयहिंदला दाखल झालो आणि ती सुखकर वाटायला लागली, जेव्हा २००५ मध्ये जेएनयूच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि अपेक्षित कक्षेत पोहोचल्यासारखं वाटलं जेव्हा प्रतिष्ठित शिष्यवृत्ती घेऊन २००७मध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी युरोपला गेलो.......